लक्ष्य-
बदलत्या काळाशी सुसंगत व संघटित असे पणन जाळे मुलभुत सुविधांसह विकसित करणे जेणेकरुन शेतक-यांना त्यांच्या मालाची वाजवी किंमत मिळेल आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा कृषीमाल उपलब्ध होवु शकेल.
* राज्यातील सर्व पणन सहकारी संस्थांवर कडक नियंत्रण ठेवणे जेणेकरुन सामान्य लोकांना चांगल्या शेतीमालाचा पुरवठा होणारी यंत्रणा विकसित होवु शकेल.
* शेतक-यांना चांगल्या पणन संधी उपलब्ध करुन देणे.
* शेतीमालाच्या विपणनातील दलालांची साखळी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि शेतक-यांना थेट पणन परवाना, शेतकरी ग्राहक बाजार परवाना, खाजगी बाजार परवाना, सिंगल लायसन्स परवाना यांच्या माध्यमातुन पर्यायी बाजार जाळे उपलब्ध करुन देणे.
* ग्राहकांना व शेतक-यांना मिळणा-या शेतीमालाच्या किंमतीत समानता साधणे.
* शेतीमालाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि सरकारी योजना व सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातुन माल निर्यातक्षम बनविणे.